लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्ताने...

एखादा माणूस आपल्या आयुष्यात किती क्षेत्रांचे ज्ञान आत्मसात करून त्यात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो हे आपल्याला पाहायचे असल्यास लोकमान्य टिळकांचा अभ्यास करावा.

लोकमान्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आणि कल्याणासाठी वेचले. हे करण्यासाठी त्यांना ज्या ज्या क्षेत्रांचा अभ्यास करणे आवश्यक वाटले ते सर्व करून देशहित साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


लोकमान्य टिळक आणि स्वराज्य…

ब्रिटिशांकडे स्वराज्याची मागणी करणारे लोकमान्य टिळक हे एक प्रमुख नेते होते. मात्र अनेकांना टिळकांची स्वराज्याची मागणी नक्की काय होती याबद्दल द्विधा आहे.

लोकमान्यांची स्वराज्याची मागणी म्हणजे आमचा राज्यकारभार आमच्या हाती द्या अशीच होती. टिळकांनी मागितलेले स्वराज्य म्हणजे ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ नव्हते ही बाब खरी आहे.

मात्र ती मागणी म्हणजे केवळ ते म्युनिसिपालिट्या आणि प्रांतिक सरकारांसाठी अधिकार मागत होते हे मात्र खरे नाही.

औक्षणाचे हिंदू धर्मातील महत्व


आपण हिंदू धर्मीय लोक सहिष्णू असतो. धार्मिक असतो. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा-रिवाज नेमाने पाळतो.

        आपल्या धर्मात सांगितलेली प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे. मनुष्य जन्मल्यापासून मरेपर्यंत जे सोळा संस्कार केले जातात त्या प्रत्येकामागे शास्त्र आहे.

        संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणणं असो, किंवा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम देवासमोर दिवा लावला जातो. एखादी शुभवार्ता समजली, की देवापुढं दिवा लावून साखर ठेवली जाते.

        देवाची नित्यपूजा झाल्यानंतर निरांजनाने ओवाळून उदबत्ती, कापूर लावला जातो. एखादं मूल जन्माला आलं, की अकराव्या किंवा बाराव्या दिवशी नामकरण करण्यात येतं. नामकरण करताना पाळण्याचीही पूजा केली जाते. मग बाळाला आईला औक्षण केलं जातं.‌ नंतर जावळ काढणं असो, वाढदिवस साजरा करत असताना औक्षण असतंच असतं. अगदी कोणत्याही शुभप्रसंगी औक्षण करतात. हे औक्षण करण्यामागील उद्देश काय आहे ?


औक्षणाचा अध्यात्मिक अर्थ

        औक्षण म्हणजे दिवा लावून देवाला अथवा व्यक्तीला ओवाळणे. त्यातही दोन‌ प्रकार औक्षण केले जाते. तेलवातीचे औक्षण व फुलवातीचे औक्षण. म्हणजेच निरांजनात दोन प्रकारच्या वाती असतात.

गुरुपौर्णिमा


आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे.

        आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. हिंदु धर्मांतमहर्षी व्यास आदय गुरु समजले जातात. या दिवशी व्यास मुनिंनी ब्रम्हसुत्रांचे लिखाण पुर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचे ही मानले जाते. म्हणुनच गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदु संस्कुतीला अनेक धर्मग्रंथ दिले. म्हणुनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करुन, आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.